मनजीत चिल्लरबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी
Things you don't know about Manjeet Chillar

१. मनजीतने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक कुस्तीपटू म्हणून केली. एक अपघातात त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याने कुस्ती खेळणे थांबवून कबड्डी खेळणे सुरू केले. पुढे जाऊन तो भारताचा प्रमुख खेळाडू बनला.
२. कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी मनजीतने एका महिन्यात १२ किलो वजन घटवले होते. या स्पर्धेसाठी ५० किलो वजनाचा निकष होता. मनजीतचे वजन ६२ किलो असल्याने तो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार नव्हता. आपले वजन कमी करून तो या स्पर्धेसाठी पात्र ठरला.
३.मनजीत नवनवीन फॅशन ट्रेंड्स बद्दल सजग असतो. त्याला त्याचे संघसहकारी फॅशन फ्रीक म्हणतात.
४. निवृत्तीनंतर मनजीतचा प्रशिक्षक बनण्याचा इरादा आहे.तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे असे त्याला वाटते. स्वतःची कबड्डी अकादमी सुरू करण्याचीदेखील त्याची मनीषा आहे.
५. मनजीतने भारताकडून २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकले आहे.
६. भारताकडून त्याने २०१६ चा विश्वचषक आणि २०१८ मध्ये दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे.
७.मनजीतला अजूनही प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
८. प्रो कबड्डी लीगमध्ये ३०० टॅकल पॉईंट्स मिळवणारा मनजीत हा पहिला खेळाडू आहे.
९. प्रो कबड्डीच्या दोन हंगामांत सर्वाधिक टॅकल पॉईंट्स मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे.
१०. प्रो कबड्डीत सर्वाधिक ३३९ टॅकल पॉईंट्स आणि सर्वाधिक ३२४ यशस्वी टॅकलचा विक्रम मनजीतच्या नावावर आहे.
११. मनजीत प्रो कबड्डी मधील अनेक खेळाडूंचा आदर्श आहे.या खेळाडूंनी वेळोवेळी हे बोलून दाखवले आहे.