राजस्थान सरकारचा मोठा निर्णय – कबड्डी खेळाडूंना देणार जमीन 

Rajasthan government's big decision - to give land to Kabaddi players

ऑलिंपिक, आशियाई तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राजस्थानच्या रहिवाशी खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. राजस्थान सरकारतर्फे अशा १३ खेळाडूंना २५ बिघे जमीन देण्यात येणार आहे. यामध्ये तीन कबड्डी खेळाडूंचाही समावेश आहे.
ऑलिपिंक तसेच आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना मोफत तर या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना सवलतीच्या दरात जमीन उपलबध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २०१४ च्या आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डीचे सुवर्णपदक मिळवलेली सुमित्रा शर्मा, २०१८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवलेली शालिनी पाठक आणि कांस्य पदक विजेता राजूलाल चौधरी या कबड्डीपटूंचा समावेश आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या या निर्णयाचे खेळाडूंकडून स्वागत केले जात आहे. सरकारच्या अशा निर्णयांमुळे राज्यात क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढेल असे मत अनेकांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकविजेत्या खेळाडूंना नोकरी देण्याची घोषणादेखील केली होती.