रायगडच्या कबड्डी पंचांची मुख्यमंत्री निधीत मदत

रायगड – सध्या करोनामुळे सबंध भारतात हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.
करोना रुग्णांची संख्या वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून सरकारने नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.
