भारताने विश्वचषक जिंकला पण क्रीडामंत्री मात्र ट्रोल झाले…

India won the World Cup but the Sports Minister got trolled 

अहमदाबाद येथे २०१६ मध्ये पार पडलेला कबड्डी विश्वचषक भारताने जिंकला. अंतिम फेरीत इराणचा पराभव करत भारताने सलग तिसऱ्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयाने भारताने पुन्हा एकदा कबड्डीमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने विजय मिळवला तरी या विजयोत्सवात एक गोष्ट चाहत्यांना खटकली.
भारत विरुद्ध इराण या अंतिम सामन्यासाठी तत्कालीन क्रीडामंत्री विजय गोयल हे देखील उपस्थित होते. भारताने विजय मिळवल्यावर भारतीय संघाला गोयल यांच्याच हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी गोयल यांच्या वागण्याने कबड्डी चाहते नाराज झाले. झाले असे की, गोयल यांनी भारतीय संघाला चषक प्रदान केला मात्र ते त्यानंतरही व्यासपीठावरच थांबून राहिले. वास्तविकतः  चषक प्रदान केल्यावर त्यांनी संघाला आपल्या विजयाचा आनंद लुटू देणे अपेक्षित होते. तसेच संघाला चषकाबरोबर फोटो काढू दिले पाहिजे होते. गोयल मात्र असे न करता फोटो काढण्यासाठी व्यासपीठावरच थांबून राहिले. फोटोग्राफर्सने विनंती करूनही गोयल जागेवरून हलले नाहीत.
साहजिकच सोशल मीडियावर गोयल यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. अनेकांनी त्यांच्यावर ‘निर्लज्ज राजकारणी’ म्हणत टीका केली होती. काहीजणांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत गोयल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
याआधी रिओ ऑलिंपिकमध्ये सुद्धा गोयल यांच्या वर्तनाबद्दल आयोजकांनी त्यांचा पास रद्द करण्याची ताकीद दिली होती.